गडचांदूर : दिनांक: २०/०४/२०२५: कोया संस्कृतीत “नैतिक मूल्यांचा खजाना” आहे; त्यामुळे कोया संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या गावखेड्यातील सगाबांधवांना साथ देने गरजेचे आहे.असे आव्हान कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ शारदा टेकाम, सहाय्यक प्राध्यापीका शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,चंद्रपूर यांनी केले.महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले हे खरे शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते आहेत, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक मा.रवि शेंडे यांनी केले. विरांगना राणी हिराई आत्राम यांनी चांदागडच्या कलीकंकाली पेनठान्याचे बांधकाम केले,असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक डॉ प्रविण येरमे यांनी केले. महापुरुषांनी केलेल्या संघर्षामुळेच आज सामान्य माणूस सन्मानाने जगत आहे. त्यांच्या विचारांमुळेच समाजात सकारात्मक परिवर्तन घडून येते आहे. येणाऱ्या काळात हेच विचार परिवर्तनाचा धागा ठरतील, असे प्रतिपादन युवा वक्ता अनिकेत दुर्गे यांनी केले.सर्व मंचावरील मान्यवरांचे स्वागत संविधान,गोंडी संस्कृतीचे संदर्भ पुस्तक व पेन भेट देऊन केले.
क्रांतिवीर शहीद बाबुराव पुल्लेसुर शेडमाके स्मारक समिती, राणी दुर्गावती महिला बचत गट, गोंदोला मातृशक्ती महिला बचत गट, जोगाई डोंगर पेनठाणा सेवा समिती आणि गोंदोला फाउंडेशन, गडचांदूर यांच्या संयक्त विद्यमाने विरांगना राणी हिराई आत्राम, चक्रवर्ती सम्राट अशोक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या संयुक्त जन्मोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. शारदा टेकाम, उद्घाटक म्हणून रवी शेंडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण येरमे व युवा वक्ता मा.अनिकेत दुर्गे, सत्कारमूर्ती म्हणून गोंदोला फाउंडेशनचे जिल्हा संघटक तथा रुग्णसेवक संजुभाऊ सोयाम उपस्थित होते. त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा, गोंडी संस्कृतीचे संदर्भ पुस्तक व पेन भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी गोंदोला हिरासुका लिंगो संगीत मंडळ, चांदागड यांच्या सामाजिक प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाची प्रास्ताविक मा.संदिप पोरेते सर यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन मारोती सोयाम यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार मा.वनपाल सोयाम सर यांनी व्यक्त केले.तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा.दिनेशजी किन्नाके,मा.जंगुजी रायसिडाम सर,मा.सुंगाभाऊ तोडसाम,मा.संजयजी कुळमेथे,मा.मनिषाताई संदिप परचाके,मा.काशिराम परचाके,मा.कविताताई आत्राम, मा.महेश परचाके आणि मा.सुर्यभान तलांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.